शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य; पाणंद रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करा – आमदार अमोलदादा पाटील

0 16

पारोळा (प्रतिनिधी) दि. २२ एप्रिल २०२६ रोजी “मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना” संदर्भात एरंडोल विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आमदार अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय, पारोळा येथे संपन्न झाली.या बैठकीत उपविभागीय अधिकारी मनिष गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक काटे, पारोळा तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, तहसीलदार गोपाल पाटील, तालुका कृषि अधिकारी दिपक आहेर, अरविंद शिवदे, गटविकास अधिकारी दादाजी जाधव, भूषण कदम यांच्यासह पंचायत व महसूल विभागातील अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शेत/पाणंद रस्त्यांच्या समस्यांचा सखोल आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे, अंमलबजावणीतील अडथळे आणि अतिक्रमणाच्या तक्रारी यावर सविस्तर चर्चा झाली.आमदार पाटील यांनी बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की:शेत रस्ते तात्काळ मोकळे करावेतअतिक्रमण नियमानुसार हटवावेप्रलंबित प्रस्तावांना गती द्यावीकामांसाठी ठोस वेळमर्यादा निश्चित करावीप्रत्येक गावात प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ उपाययोजना करावीगुणवत्तापूर्ण व पारदर्शक कामे सुनिश्चित करावीत“शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कोणतीही टाळाटाळ न करता सर्व कामे वेळेत पूर्ण केली जावीत,” असे ठाम निर्देश त्यांनी दिले.शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी पाणंद रस्ते सुकर व कायमस्वरूपी करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.ही योजना ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणारी आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला.शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवणे हीच आपली प्राथमिकता असून अशा आढावा बैठका पुढेही सातत्याने घेतल्या जातील, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.