विद्यार्थ्यांकडून सामूहिक संविधान उद्देशिका वाचन व जागरूकता नाटिका सादरीकरण
प्रतिनिधी:- पारोळा, भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. राज्यघटनेने भारत सरकार कायदा १९३५ ची जागा देशाचा मूलभूत प्रशासकीय दस्तऐवज म्हणून घेतली आणि भारताचे अधिराज्य हे भारताचे प्रजासत्ताक बनले.
भारतीय संविधान पालन करणे हे प्रत्येक भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे, आणि याचे स्मरण कायम राहावे या उद्देशाने युनिवर्सल इंटरनॅशनल स्कुल च्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला.
शहरातील संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी श्री विश्वासराव पाटील, शाळेचे प्रिन्सिपल श्रीमती गायत्री गुजराथी आणि शिक्ष वृंद यांच्याकडून माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर शाळेतील विद्यार्थ्याने संविधान जागरूकता या विषयावर नाटिका सादर केली. नाटिकेचेच्या अंती संविधान उद्देशिका प्रतीचे वाटप करून सामूहिक वाचन करण्यात येऊन संविधानाचे महत्व तसेच कर्तव्य याची जाणीव उपस्थितांना देण्यात आली.
सतरा वर्षांपूर्वी झालेल्या २६-११ मुंबई हल्ल्यातील शूर हुतात्म्यांना तसेच बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी ऍडव्होकेट तुषार पाटील, मा. नगरसेवक दीपक अनुष्ठन, नमामि फाउंडेशन चे राहुल निकम व शहरवासी उपस्थित होते.
