‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची गतिमान प्रक्रिया

0 0


महाराष्ट्र शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ च्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीसाठी  सुरवात केली आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी  जिल्हास्तरीय  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने योजनेच्या पोर्टलवरील माहिती अपलोड करण्याच्या प्रक्रियेत पुढाकार घेऊन माहिती अपलोड करण्यात एक आदर्श ठेवला आहे.

योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून. या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मीन्नू पी. एम, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे,आणि व्यापारी बँकांचे जिल्हा समन्वयक यांचा समावेश आहे. जिल्हा उपनिबंधक ,सहकारी संस्थाहे या समितीचे ‘सदस्य सचिव’ म्हणून समृध जाधव काम पाहणार आहेत.

समितीची प्रमुख उद्दिष्टे :

योजनेच्या अंमलबजावणीचे सूक्ष्म नियोजन व नियंत्रण. केले जाणार असून आधार लिंक नसलेल्या कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध करून आधार प्रमाणीकरणासाठी विशेष मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.

पात्र-अपात्र शेतकऱ्यांच्या याद्यांचे पारदर्शक व्यवस्थापन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तत्पर निवारण करण्यासाठी सर्व विभाग, बँक यांनी समन्वयाने काम सुरू केले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची कामगिरी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने माहिती अपलोड करण्याच्या कामात मोठी आघाडी घेतली आहे. दि. २५ जून २०२६ अखेरच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील ९९.९६%पात्र सभासदांची माहिती पोर्टलवर यशस्वीरीत्या अपलोड करण्यात आली आहे. यात एकूण ५५ हजार ९८१ अपलोड करण्यात आली असून  यात २५ जून अखेर  एकूण ५६ हजार ०५ पात्र ठरले आहेत. केवळ १७ सभासदांची माहिती प्रलंबित आहे. गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांनी १००% माहिती अपलोड केली आहे. इतर तालुक्यांमध्येही ९९.८७% ते ९९.९८% पर्यंत काम पूर्ण झाले आहे.

सभासद आधार विरहित असून, ५०० रुपयांच्या आतील कर्ज असलेल्या २१ सभासदांची स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे. यातून शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्या या प्रभावी नियोजनामुळे कर्जमुक्तीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उर्वरित अल्प कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, यामुळे पात्र शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्तीचा मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्हास्तरीय समितीच्या देखरेखीखाली आणि बँकेच्या गतीमान कार्यामुळे ही योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे.

०००००

डॉ. मीरा ढास,

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय,छत्रपती संभाजीनगर

 

Leave A Reply

Your email address will not be published.