स्वच्छ, सुंदर भारतासाठी नागरिकांनी पुढे यावे

0 0


मुंबई, दि.१ : ‘स्वच्छता पखवाड़ा २०२६’ हा उपक्रम या वर्षी १ जुलैपासून राबवण्यात येत आहे. स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी आहे. ‘स्वच्छता’ सर्व घटकांतील लोकांना एकत्र आणणारी ही मोहीम आहे. भारत पेट्रोलियमतर्फे स्वच्छता, कचरा वर्गीकरण आणि कचरामुक्त भारताचे महत्त्व शाळांमध्ये समजावे, यासाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धा, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता रॅली, प्रतिज्ञा व विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत, असे तेल उद्योग राज्यस्तरीय समन्वयक मिहिर जोशी यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भारत पेट्रोलियम आणि भारतीय रेल्वे विभागाच्या वतीने स्वच्छता हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास रेल्वेचे अधिकारी वरिष्ठ डीसीएम प्रकाश कनोजिया, स्टेशन प्रबंधक पी. डी. परब, इन्स्पेक्टर इन्चार्ज, भारत पेट्रोलियमचे मुख्य प्रबंधक दिपक वाघ, उप महाप्रबंधक अमित सोनकुसरे, वरिष्ठ प्रबंधक रितेश जाधव उपस्थित होते.

मिहीर जोशी म्हणाले की, स्वच्छता उत्सव या मोहिमेच्या अंतर्गत नुक्कडनाटक च्या माध्यमातून जनजागृती व स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सफाई मित्र यांचाही सन्मान या कार्यक्रमात केला गेला. स्वच्छ व सुंदर भारत देश साकारण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान असणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.

0000

संध्या गरवारे/विसंअ

Leave A Reply

Your email address will not be published.