बीड शहर पाणी पुरवठा योजनेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून आढावा

बीड दि.९ ,(जिमाका): महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अमृत-१ योजनेअंतर्गत बीड शहर पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर आढावा घेतला. योजना मंजूर होऊनही बीड शहराला अद्याप पाणी मिळत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली. या योजनेची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची असल्याने, कामचुकार आणि दोषी संबंधित कंत्राटदारावर नियमानुसार तातडीने योग्य ती कारवाई करावी, असे कडक निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले आहेत.
आढावा बैठकीत नगरपरिषदेच्या थकबाकीचा मुद्दाही समोर आला. नगरपरिषदेची वीज बिलाची थकबाकी असल्याने महावितरणकडून वाढीव विद्युत भार मंजूर केला जात नाही, ज्यामुळे ही पाणी पुरवठा योजना सध्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकलेली नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार विजयसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस, आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह संबंधित विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन पद्धतीने या बैठकीत सहभागी झाले होते.
००००
