पारोळा | प्रतिनिधी, केंद्र शासनाच्या ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत पारोळा नगरपरिषदेच्या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यांसाठी चावी वाटप व बांधकाम परवानगी वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या योजनेचा मुख्य उद्देश समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून १ लाख ५० हजार रुपये व राज्य शासनाकडून १ लाख रुपये, असे एकूण २ लाख ५० हजार रुपये प्रति घरकुल अनुदान देण्यात येते.मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्नप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष चंद्रकांत भिकनराव पाटील हे होते. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष ॲड. रोहन वसंतराव मोरे तसेच मुख्याधिकारी डॉ. तुषार नेरकर हे उपस्थित होते.१० घरकुल चावी वाटप, १८ बांधकाम परवानग्यांचे वितरणया कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते १८ लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी आदेशांचे वितरण करण्यात आले, तर १० घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.लोकप्रतिनिधी, अधिकारी व लाभार्थ्यांची मोठी उपस्थितीकार्यक्रमास शिवसेना गटनेते चौधरी अमृत नाना, उपगटनेते पंकज मराठे, नगरसेवक नितीन दत्तात्रय सोनार, भाजप गटनेते अलकाबाई धीरज महाजन, उपगटनेत्या मंगला सुदाम चौधरी, नगरसेवक अमोल गोविंद शिरोळे यांच्यासह नवनिर्वाचित सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. तसेच शहरातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह लाभार्थी व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशासनाचा सक्रिय सहभागकार्यक्रमास प्रशासनाधिकारी श्रीमती यामिनी लक्ष्मणसा जटे, रचना सहाय्यक साक्षी मराठे, स्थापत्य अभियंता सुमित पाटील, लेखापाल दीपक महाजन, नगराध्यक्षांचे स्वीय सहाय्यक किशोर चौधरी, शहर तांत्रिक कक्ष अधिकारी भूषण महाजन, शहर समन्वयक शुभम दिनेश कंखरे, समुदाय संघटक कैलास पावसे, क्षेत्रीय समन्वयक राहुल प्रजापती, कैलास वानखेडे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत महाजन यांनी केले.पीएम आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत ऑनलाइन नोंदणीयाप्रसंगी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत इच्छुक लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. या योजनेचा अधिकाधिक गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
